धर्मांतराला प्रोत्साहन देणार्या अल्पंसख्यांकांसाठीच्या सरकारी योजना तात्काळ बंद करा – अधिवक्ता अश्विनी उपाध्याय, सर्वाेच्च न्यायालय -nnl
गोवा| केवळ अल्पसंख्यांकांसाठीच्या म्हणून असलेल्या २०० योजना केंद्र सरकारकडून चालवल्या जातात. याशिवाय प्रत्येक राज्यातील मिळून या योजनांची संख्या ५०० पेक्षा पुढे जाईल. या व्यतिरिक्त केवळ अल्पसंख्यांकांसाठी म्हणून अन्यही योजनाही आहेत. या सर्व योजना हिंदूंच्या करांमधून चालवल्या जातात. त्यामुळे अल्प संख्यांकांसाठीच्या या योजना म्हणजे एक प्रकारे श्रीमंत हिंदूंच्या पैशातून गरीब हिंदूंचे धर्मांतरच होय. तरी अल्पसंख्यांकांच्या योजनांमुळे धर्मांतराला प्रोत्साहन मिळत असल्याने या योजना तात्काळ बंद कराव्यात, अशी मागणी सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता अश्विनी उपाध्याय यांनी केली. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘हिंदुत्वाचे रक्षण’ यावर बोलत होते.
हिंदूंनी त्यांच्यावर होणार्या आक्रमणांना प्रत्युत्तर देण्याची सिद्धता ठेवावी! - सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन न्यूज’
जेवढ्या गोहत्या गेल्या ...
