Global warming awareness ; ग्लोबल वार्मिंग जागरूकता काळाची गरज, माजी,आमदार अमिता भाभी चव्हाण
नवीन नांदेड l तापमान कमी करण्यासाठी जनजागृती केली पाहिजे यासाठी यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे गरजेचे असल्याचे सांगून विद्यार्थ्यांमध्ये ग्लोबल वॅमिग विषयी जागरूकता मनात निर्माण होऊन ते प्रदुषण कमी करण्यासाठी प्रयत्न करतील, शाळेतील उपक्रमशिल शिक्षक एम.टी.कदम यांच्या हस्तलिखित विमोचन प्रसंगी माजी आमदार अमिताभाभी चव्हाण यांनी केले.
पृथ्वीच्या दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे मानवाला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या तापमाणामुळे जलाशयातील पाण्याचे मोठया प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. त्यामुळे ओढे, नद्या,नाले, बारमाही वाहत नाहीत,वाढत्या तापमाना
मुळे अन्न धान्य उत्पादन कमी झालेले आहे. आज पाण्याची समस्या गंभीर झालेली आहे. प्रचंड प्रमाणात प्रदूषण वाढलेले आहे. या सर्व गोष्टीमागे पृथ्वीचे वाढते तापमान हे एकमेव कारण आहे म्हणून पृथ्...
