भाई धोंडगे पाठोपाठ चिखलीकरानाही सलग दुसऱ्यांदा लोकसभेत ‘जाण्यास अपयश, ३४ वर्षानंतर योग” हुकला
लोहा| राजकारणात जय- पराजय' होतच असतो, ते विसरून नेता पुन्हा जनतेच्या दरबारात जात असतात. जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच लोहा - -कधार' अग्रस्थानी राहिले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण व माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या भोवतीच गेली तीन दशक जिल्ह्याचे राजकारण फिरते आहे. पण तीन महिण्यापूर्वी अशोकराव' भाजपात आले आणि या दोन्ही नेतृत्वान समेट' झाला. पण तो' जनतेला '' आवडला नाही हेच निकालातून स्पष्ट दिसले. १९७७ नंतर भाई धोंडगे सलग दुसन्यांदा लोकसभेत जाऊ शकले नाहीत. ३४ वर्षानंतर त्याचीच पुनरावृत्ती झाली असून, मन्याड खोऱ्यातील नेतृत्व प्रतापरावांनाही दुस-यांदा' लोकसभेत जाण्यास अपयश आले आहे.
नांदेड लोकसभा मतदार संघात २००९ पूर्वी" कंधार (आताचा लोहा) विधानसभा मतदार संघाचा समावेश होता. १९७७ मध्ये आणीबाणीच्या काळात शेकापक्षाचे नेते भाई केशवराव धोंडगे यांनी नांदेड लोकसभा, निव...
