Vighapith : चार जमीनग्रस्त पाल्याचे विघापिठ सेवेत सामावून घेण्यासाठी विघापिठ समोर आमरण उपोषण
नवीन नांदेड l चार जमीनग्रस्त पाल्याने स्वारातीम विघापिठ सेवेत तात्काळ सेवेत रुजू करून घेवून न्याय द्यावा यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ समोर चार जणांनी 6 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे, परंतु दोन दिवसांचा कालावधी होऊनही विघापिठ प्रशासनाने दखल घेतली नाही, ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी उपोषण स्थळी पोलीस बंदोबस्त दिला असुन उपोषण कर्ते यांच्यी वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून ग्रामस्थांनी उपोषण स्थळी भेट दिली आहे.
स्वारातीम विघापिठ कुलगुरू यांना दिलेल्या निवेदनात , आम्ही शेतकरी पाल्य वांरवार पत्रव्यवहार करूनही आम्हाला विद्यापीठ न्याय देत नाही व्यतीरिक्त बाहेरचे व्यक्ती विद्यापीठ सेवेत सामावून घेत आहे,आम्ही आमची जमीन विद्यापीठाला देवून चूक केली का, आपण आम्हाला काम देण्याचे सोडून बाहेरील व्यक्तीनां कामावर घेतलेले अनेक आहेत.
म्हणून आपण विद्यापीठाने ठरलेल्या नियम...
