hit by bogus seeds : देगलूर तालुक्यातील थडी सावरगाव इथल्या शेतकऱ्यांना बसला बोगस बियाण्याचा फटका.!
नांदेड, अनिल मादसवार| मध्य प्रदेशातील बियाणं कमी पैशात बाजारात विक्रीसाठी आल्याने शेतकऱ्यांनी खरेदीसाठी चांगलीच गर्दी केली होती. बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र आठ दिवस झाले तरी बियाणे उगवले नाही. त्यामुळे थडी सावरगाव येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचे बोगस बियाणे असल्याच्या तक्रारी कृषी अधिकाऱ्याकडे केल्या असून, त्यावरून आता चौकशी सुरू झाली आहे.
मागील बारा वर्षापूर्वी नांदेड जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कपाशीची नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात लागवणं करत होते. परंतु कपाशीचे महाग बियाणे, खते, औषधी, फवारणी, वेचणीचे खर्च आणि मिळणारा भाव याचा ताळमेळ बसत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड सुरू केली आहे. मात्र सोयाबाईंच्या बियाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगसपणा दिसून येत असल्याने शेतकरी वर्गात धास्ती निर्माण झाली आहे.
देगलूर तालुक्यातील मौजे थड...
