Farmers deprived of crop loans due ” बँकेच्या मुजोर व्यवस्थापनामुळे शेतकरी पिक कर्जापासून वंचित -NNL
देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले| खरीप हंगामात शेतकऱ्यांनी दिलेले प्रस्ताव धूळखात पडून असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. येथील आयडीबिआय बँकेच्या मुजोर व्यवस्थापनामुळे शेतकरी पिक कर्जापासून वंचित असल्याने बँकेचे उबरवटे झिजत आहेत.
खरीप हंगामात ग्रामीण भागातील शेतकरी खरीपाच्या पिकाची पेरणी करुन पिकांच्या देखभालीसाठी आर्थिक मदत म्हणून बँकांकाढून मिळणारे कृषी कर्ज घेतात. शेतकऱ्यांना एक एकरी प्रमाणे पिक कर्ज उपलब्ध करून खरीपाच्या पिकाची फवारणी कोळपणी, निंदणी करुन पिकाची देखभाल करतात. मात्र शेतकरी खरीपाच्या पिकाची पेरणी करुन बँकेकडे पिक कर्जाची मागणी केली असता जणू काय..? सोयाबीन खळे करायच्या वेळी हातात रक्कम मिळते की नाही...? असा सवाल शेतकऱ्यांना पडतो आहे.
पिक कर्ज उपलब्ध करून देणारे अधिकारी सुट्टीवर गेल्याने त्यांच्या जागेवर अधिकारी मागवून शेतकऱ्यांना पिक कर्जाची लवकरात लवकर उपलब्धता क...
