Annabhau Sathe: शिक्षणाने माणूस तर अण्णाभाऊंच्या साहित्याने समाज घडला – प्रा.डॉ. वैजनाथ अनमुलवाड -NNL
उस्माननगर| शिक्षणाने माणूस घडतो , आणि साहित्याने समाज घडतो. तर साहीत्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य लेखनीने सुसंस्कृत समाज घडला असे मत प्रा.डॉ.वैजनाथ अनमुलवाड (. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा शास्त्र विभाग) यांनी आपले मनोगतातून व्यक्त केले.
कंधार तालुक्यातील उस्माननगर येथे दि .२२ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न ,लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सकाळी छ.शिवाजीमहाराज, क्रांतीविर उस्ताद लहूजी साळवे , डॉ.बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .त्यानंतर क्रांतीध्वजाचे ध्वजारोहण उस्माननगर पोलीस स्टेशनचे पोलीस जमादार निल्लप्पा शिवपुजे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जयंती मंडळाकडून मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावच्या प्रथ...
