Arjun Maharaj Khade : चांगले मरण यावे यासाठी पुण्य कर्म करा; तर कपाळाला लावण्यासाठी माती सुद्धा नेता येत नाही – हभप.अर्जुन महाराज खाडे -NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार। चांगली कर्म करावी, जेणेकरून देवांनी तुमची वाट बघावी,,, संत ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 22 व्या वर्षी समाधी घेतली. मनुष्य जन्माचा उद्देश सफल झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. त्यावेळी लोकांनी त्यांना न जाण्याची विनंती केली. चांगलं काम करणाऱ्या लोकांना देव सुद्धा प्रेम करतो.. आणि प्रेम करणारी लोक भरपूर असतात. मात्र आपल्या मनुष्य जीवनात वय जास्त दिवस झाले की, घरातील लोक सुद्धा मरायची वाट पाहतात, त्यामुळे मानव जन्माला आल्यानंतर संत, महंतांचे विचार ऐकून पुण्य कर्म करून मनुष्य जीवनाचे सार्थक करा. जेणेकरून देवाचं स्मरण करत मनुष्याने देह ठेवला पाहिजे... तर कपाळाला लावण्यासाठी माती सुद्धा सोबत नेता येत नाही असा उपदेश हभप.अर्जुन महाराज खाडे आळंदीकर यांनी केला.
हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिरात पवित्र श्रावण मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अ...
