Naam Japa Yagya : ॐ नमः शिवाय नामजप यज्ञ भक्तिभाव, शांतता आणि शिवस्मरणात महिला पुरुष भाविक रंगले
हिमायतनगर | भगवंतावर श्रद्धा असेल तर मोठं काही देण्याची गरज नाही साधेपणातच शिवशक्तीचं सामर्थ्य आहे, तांब्याभर पाणी आणि एक बेलपत्र अर्पण केल्यानेही महादेव प्रसन्न होतो असा संदेश बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी दिला.
नामजप यज्ञाचा सातवा दिवस अत्यंत मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळ पासूनच मंदिर परिसरात भाविकांची रीघ लागलेली होती. मंत्रोच्चार, धूप, दीप आणि घंटानादाच्या गजरात “ॐ नमः शिवाय” चा अखंड जप अखिल वातावरणात गुंजत होता. रात्री 8 वाजता बालयोगी व्यंकट स्वामी महाराजांनी ओम नमः शिवाय नामजप यज्ञात भेट दिली.
यावेळी त्यांच्यासोबत भागवताचार्य सारंग चैतन्य जी महाराज उपस्थित होते. सातव्या आणि आठव्या दिवशी उमरखेड तालुक्यातील बोरी येथील भजनी मंडळांनी रात्रीच्या अखंड नाम जाप मध्ये सहभाग घेतला. भजनी मंडळाच्या गोड आवाजात टाळमृदंगाची साथ त्यामुळे मंदिर परिसर ओम नमः शिवाय नामाच्या जयजयक...
