freedom struggle ; मराठी संपादकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान
"सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?" असा अग्रलेख लिहिणारे लोकमान्य टिळक नि इंग्रजांना प्रखर लढा देणारे संपादक पंडित बाबुराव पराडकर नि माधवराव सप्रे यांचा वारसा पुढे नेणारे निर्भिड संपादक आजही कधी नव्हे तेवढे हवे आहेत. जेव्हा जनसामांन्यावर अन्याय, महागाई, रोगराई व रोजगार नि शेतकरी - दलितांचे व महिलांचे जीवन असह्य होते तेव्हा तेजस्वी पत्रकारिता पुढे येते. लोकशाही व्यवस्था पारतंत्र्यात असताना जे लोकमान्य टिळक, पराडकर नि सप्रे, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दिनकर जवळकर, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील, दिनबंधूकार कृष्णराव भालेकर यांना जमले ते आज लोकशाही व्यवस्था असताना का जमू नये याचा विचार आजच्या संपादक नि पत्रकारितेने करायला हवा. नाही का ?
पत्रकारिता हे क्षेत्र जनजागरणाचं नि लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आहे, हे सर्वज्ञात आहे. लोकशाही व्यवस्थेतील पत्रकारितेला गुणवत्ता नि अर्थवत्तेचे नवे धुमारे फुटता...
