Close these toll booths : बंद करा हे टोलनाके आणि टोलगुंडागर्दी..!
टोलनाक्यावर होणारी गुंडागर्दी ही नवीन नाही. त्यात घट नाही तर वाढ होत चालली आहे. आता पत्रकारांनाही या टोलगुंडागर्दीचा सामना करावा लागत आहे. याचा राज्यकर्त्यांनी अत्यंत गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, नसता लोकशाहीचा हा चौथा स्तंभ धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.
थोडीशी गुंतवणूक करुन जनतेला अनेक वर्ष हजारो पटीत लुटण्याचा सरकारी परवाना ज्यांना मिळतो ते मस्तीला येणारच. टोलवसुलीसाठी ते आपल्या पदरी गुंडांना बाळगणारच. शेवटी पैसा बोलता है. पैसे वसुली करीत असतांना अरेरावी करणे, उद्धट बोलणे, दादागिरी करणे, अंगावर धावून येणे, मारहाण करणे असे प्रकार रोज कुठे ना कुठे टोलनाक्यावर घडत असतात. त्यात सामान्य जणांबरोबर कर्मचारी, अधिकारी, पुढारी, व्यापारी, शेतकरी आणि पत्रकारही भरडल्या जात असतील तर सरकार हे टोलनाके का बंद करीत नाहीत ? टोलधाडीच्या या वाढत जाणाऱ्या गुंडगिरीसमोर सरकार गुडघे का टेकत आहे ?
परव...
