सहस्रकुंड येथील वन जमिनीवरील अतिक्रमण वन विभागाने दुसऱ्यांदा हटविले -NNL
किनवट,परमेश्वर पेशवे। नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा पर्यटन स्थळ परिसरातील वन जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना वन विभागाने अनेक वेळा नोटीस बजावून देखील सहस्त्रकुंड येथील शेतकऱ्याने वन जमिनीवर अतिक्रमण करून सोयाबीनची पेरणी केल्याने इस्लापूर वन विभागाने पोलीस बंदोबस्तात वन जमिनीवरील अतिक्रमण निष्काशीत करून पोलीस बंदोबस्तातच इस्लापूर वन विभागाने त्या अतिक्रमण जमीनीवर वन महोत्सव अंतर्गत पोलीस बंदोबस्तातच वृक्षारोपणाची लागवड केली.
नांदेड किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा हा नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असुन, अशा या प्रसिद्ध ठिकाणी असलेल्या वाळकी (बु) सर्वे नंबर 52 येथील वन जमिनीवर अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते. त्यावेळेस देखील पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवल्याने त्यावेळी या ठिकाणी पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. मात्र या शेतकऱ्यांनी पुन्हा यावर्ष...
