on indefinite strike since : सरकार व शासनाच्या उदासीनते मुळे १२ फेब्रुवारी पासून आरोग्य मित्रांचा बेमुदत संप
नांदेड| आजारी असलेल्या रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना जीवनदायी योजना या नावातच खुप काही स्पष्ट दिसून येते आणि त्यांच्या आशा बळावतात. महाराष्ट्र राज्यात सन २०१३ मध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने ही योजना सुरु करण्यात आली. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते.
नंतर युती सरकारच्या काळात या योजनेच्या नावात बदल करून सन २०१७ मध्ये महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना या नावाने योजना सुरु ठेवण्यात आली होती. परंतु १ जुलै २०२४ पासून एकात्मिक आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणून सध्यस्थितीत ही जीवनदायी योजना सुरु आहे.
राज्यात साधारणतः १२०० पेक्षा अधिक कर्मचारी आरोग्य मित्र म्हणून काम करीत आहेत. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) नेते कॉ.डॉ. डी.एल.कराड अध्यक्ष आणि कॉ.किरणकुमार ढमढेरे सरचिटणीस यांच्या नेतृत्वात १...
