Water Rich : जलतारा : पाणीदार नांदेडकडे भक्कम पाऊल
नांदेड | नांदेड जिल्हा पाणीदार करण्याच्या दिशेने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलले असून, जिल्हाभर ‘जलतारा’ ही विशेष मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक असलेल्या नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना पाण्याची कायमस्वरूपी सुविधा मिळावी, यासाठी प्रत्येक शेतात जलसंधारण या उद्देशाने तब्बल १ लाख जलतारे उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
या मोहिमेस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वतः पुढाकार घेतला असून, प्रत्येक तालुक्यात प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना जलताराचे महत्त्व, तांत्रिक रचना आणि दीर्घकालीन फायदे समजावून सांगत प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जात आहे. या उपक्रमामुळे पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरवले जाऊन भूजलपातळी वाढीस मोठी चालना मिळणार आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना वर्षातून दोन पिके घेणे शक्य होणार आह...
