285 guests traveled half a km by boat for the funeral : पिंपरीच्या कोंडाबाई पवार यांच्या अंत्यविधीसाठी अर्धा किमी नावेतून 285 पाहुण्याने केला प्रवास -NNL
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात पैनगंगा नदीला पूर आल्याने सर्वत्र नदी नाले भरून वाहत आहेत. नदीच्या पुराचे पाणी पिंपरी गावच्या रत्स्यावर आल्याने कामारी ते पिंपरी गावचा तीन दिवसापासून संपर्क तुटला आहे. दरम्यान पिंपरीच्या कोंडाबाई पवार यांचा निधन झाल्याने आज अंत्यविधीसाठी आलेल्या 285 पाहुण्याने चक्क अर्धा किमी नावेतून प्रवास करून उपस्थिती लावली आहे. त्यामुळे येथील पुलासह रत्स्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, दरवर्षी या गावचा पुराच्या पाण्याने संपर्क तुटतो यावर राजकीय नेते व शेणाने उपाय काढून पुलासह उंच मजबूत रास्ता करून द्यावा अशी मागणी केली जात आहे.
हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीला महापूर आला आहे. केदारनाथ कडून लाखाडी नदी ही कामारी जवळ पैनगंगेला येऊन मिळते येथे नदीचा संगम झाल्याने पैनगंगेचे पाञ भरले की लाखाडी नदीचे पाणी पाञात जात नाही. त्यामुळे कामारी जवळील लाखाडी नदी पुराच्या...
