Students take the exam without compromise! विद्यार्थ्यांनो बिनधास्त परीक्षा द्या ! १० वी,१२ वी तर सुरुवात आहे.. !!
सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. काहींच्या परीक्षा मध्यात आल्या आहेत. दोन ते तीन पेपर होऊन गेलेले आहेत. मात्र कुठून तरी निराशा जनक बातम्या येत राहतात. अशावेळी विद्यार्थ्यांना सांगणे आहे की, विद्यार्थ्यांनो दहावी,बारावी इतर आयुष्याची सुरुवात आहे.या परीक्षा म्हणजे तुमच्या आयुष्याची शेवटची परीक्षा नाही. या परीक्षेला कोणतीही निराशा, दुःख, नैराश्य न बाळगता पुढे जा... एखाद्या वर्षी एखादी परीक्षा देता आली नाही किंवा अपयश आले म्हणजे सर्वच संपत नाही जीवन हे सुरूच असते....
अनेक वेळा काही कारणास्तव काही विद्यार्थ्यांचे पेपर बरोबर जात नाहीत. किंवा अपेक्षित त्याला लिहिता येत नाही. काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखादा पेपरही देता येत नाही. अशावेळी निराश होऊ नये. एखादी परीक्षा तुमच्या यशा अपयशाचे सूत्र ठरू शकत नाही... आज ज्यांना यशस्वी म्हणून तुम्ही बघता त्यांनाही कधी काळी दहावी बारा...
