नविन नांदेड| संतगुरु रोहीदास तिर्थक्षेत्र बळीरामपूर नांदेड परिसरातील कै. बापूराव पाटील खतगांवकर सांस्कृतिक सभागृहात संतगुरु कबीरदास यांच्या जयंतीचे आयोजन तिर्थक्षेत्राचे संस्थापक वामनराव मे. विष्णुपूरीकर यांच्याकडून करण्यात आले होते.
सर्वप्रथम सरपंच प्रतिनिधी तथा मा. सरपंच इंद्रजित पांचाळ यांच्या शुभहस्ते व मुख्याध्यापिका एस.पी. चंद्रावार, मा. उपसरपंच संभाजी जाधव पाटील, मा. सरपंच नागोराव आंबटवार व ग्रामपंचायत सदस्य किशनराव गव्हाणे, अशोक तु. लाठकर, अॅड. प्रमोद कामठेकर, चंद्रकांत कटकमोड, गुंडप्पा बारोळे, चंद्रकांत सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सतगुरु कबीरदास यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी रघुनाथ वाघमारे, शंकर अन्नपूर्णे, साईनाथ अन्नपूर्णे, आकाश आडपवार, ग्रा.पं. लिपीक प्रतिक सुर्यवंशी, काशीनाथ पारधे, वेदांत पांचाळ, गणेश अन्नपूर्णे, शिवाजी वाघमारे, साईनाथ वाघमारे, गिरजाबाई अन्नपूर्णे, शांताबाई आडपवार, मा. ग्रा.पं.स. तुळसाबाई लाठकर, गंगासागरबाई वाघमारे, गंगाबाई वाघमारे, संगीता अन्नपूर्णे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांची उपस्थिती होती. शेवटी चायपाण्याच्या व प्रसादाच्या कार्यक्रमानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.