Friday, June 26

Godavari river; गोदावरी नदीचा काठी असलेल्या मुजामपेठ येथील नागरीकांच्ये स्थलांतर तर जवळपास पंधरा प्रतिष्ठाणे पाण्याखाली

नवीन नांदेड l विष्णुपुरी जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीच्या काठी असलेल्या धनेगाव मुजामपेठ भागातील जवळपास विस कुटुंबातील चाळीस ते पंचेचाळीस जणांना स्थलांतरीत करण्यात आले असून ग्रामपंचायत कार्यालय धनेगाव मुजामपेठ यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा जुने मुजामपेठ येथे करण्यात आली आहे, अचानक होत असलेल्या पाणी वाढ मुळे मात्र नागरिकांत भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोदावरी नदीच्या काठी असलेल्या धनेगाव मुजामपेठ ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत असलेल्या नांवघाट परिसरातील अनेक निवासस्थानी पाणी शिरल्याने जवळपास विस कुटुंबातील चाळीस ते पंचेचाळीस जणांना स्थलांतरीत करण्यात आले तर पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने गोदावरी नदी लगत असलेल्या जवळपास विविध प्रतिष्ठाने असलेल्या परिसरातील गजाळी, टाईल्स,चहाचे हाॅटेल, वेल्डिंग दुकान, गॅरेज,किराणा होलसेल दुकनात पाणी शिरल्याने जिवनाश्यक वस्तू सह अनेक वस्तू नुकसान झाले आहे,तर परिसरातील ऊस्मना बी आफमान मदरसा येथील 80 विध्यार्थी स्थलांतर करण्यात आले.

सरपंच गंगाधर ऊर्फ पिंटू पाटील शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, यांच्या सह माजी पंचायत समिती सदस्य भुजंगराव भालके, ग्रामविकास व्हि.पी.सुर्यवंशी, तलाठी सौनटक्के, ग्रामपंचायत सदस्य शेख फारूक अब्दुल्ल गफुर, अब्दुल गफुर अब्दुल कादर, सामाजिक कार्यकर्ते शेख एजाज शेख बाबु, शिवाजी बुचडे, तातेराव ढवळे ,रफी अहमद,शेख कौसर,शेख जकीर,शेख खालेद,शेख अंनिस शेख फारूक व ग्रामपंचायत कर्मचारी शेख मुख्तार शेख फारूक,शेख निसार शेख बाबु, महंमद ईलीयास,बळीराम भालके हे स्थलांतरीत ग्रामस्थांना जेवणाची व राहण्याची सोय करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!