Himayatnagar Accident : हिमायतनगरातील राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट काम; अपघातांना निमंत्रण !

IMG 20250724 134905 Himayatnagar Accident : हिमायतनगरातील राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट काम; अपघातांना निमंत्रण !

हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याची रुंदी कमी करून डिव्हायडर गायब केले आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत झालेल्या अनेक अपघातात काहीजणांनी जीव गमावला तर काहीजण लुळे पांगळे झाले आहेत. असे असतानाही संबंधित विभागाकडून हिमायतनगर शहरातुन डिव्हायडर करून नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नासंदर्भात लक्ष देत नसल्याची भावना दुचाकी आणि ऑटोचा अपघात झाल्यानंतर उपस्थितानी व्यक्त केली आहे. दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी झाली नसली तरी दोघांना गंभीर तर काही ज्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

हिमायतनगर शहरातील अपघाताच्या नियंत्रणासाठी लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नाही आणि निवडून आलेल्या कोणत्याही खासदार आमदाराने यासाठी प्रयत्न मानाभावातून प्रयत्न केले नाही. त्यामुळे दिवसेंदिवस अपघातची मालिका सुरूच आहे. आज भर दिवसा एक दुचाकी व ऑटोचा अपघात झाला  यामध्ये दोघा जणांना जबर मार लागला असुन, त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करून टाके मारण्याची वेळ आली आहे. तर ऑटो व दुचाकीवरील अनेक जण किरकोळ जखमी झाले असले तरी या अपघातात ऑटोचे मोठे नुकसान झाले आहे.

IMG 20250724 135056 Himayatnagar Accident : हिमायतनगरातील राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट काम; अपघातांना निमंत्रण !

याबाबत हिमायतनगर पोलिसात कोणतेही नोंद झाली नसली तरी हजारो नागरिकांनी घटनास्थळावर उपस्थित होऊन शहरातून झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट आणि दुर्लक्षित कामाबाबत नाराज व्यक्त केली आहे. तसेच अनेकांनी रस्त्याच्या मधून दुभाजक म्हणजेच डिव्हायडर करून आगामी काळात होणाऱ्या संभाव्य अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने मंजूर केलेल्या दुभाजक आणि उड्डाणं पूलाचे काम आणखी काही जणांचे जीव गेल्याशिवाय करणार नाहीं कां असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. आता तरी गेंड्याची कातडी पांघरलेले राजकीय पुढारी व संबंबंधित विभागाचे अधिकारी यांनी कुंभकर्ण झोपेतून जागी होऊन हिमायतनगर शहरातील मंजूर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील डिव्हायडर आणि उड्डाणपूल काम करून भविष्यात होणारे अपघात टाळतील का याकडे शहर व ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष लागून आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top