Homeनांदेडपेस्टीसाईड कंपण्या विरुद्ध आणि विविध मागण्यासाठी २६ जून रोजी नांदेड मध्ये मोर्चा...

पेस्टीसाईड कंपण्या विरुद्ध आणि विविध मागण्यासाठी २६ जून रोजी नांदेड मध्ये मोर्चा -NNL

नांदेड। मायबाप शेतकऱ्यांची कायम फसवणूक करणाऱ्या कंपण्या आता थेट व्यापाऱ्यांना बेकायदेशीररित्या लक्ष करीत असून कृषी अधिकाऱ्यांचे काम स्वतः आपले प्रतिनिधी नेमून छापेमारी करण्यास सुरवात केली आहे.

मल्टिनेशनल कंपण्याची मनमानी थांबवावी आणि इतर स्थानिक अपूर्ण मागण्यासाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) कामगार संघटना व्यापारी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व इतर स्थानिक मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी आणि महामहीम राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना निवेदन देण्यात येणार आहे.

गोदरेज,एफएमसी,अदामा सारख्या कंपण्या आपल्या खाजगी प्रतिनिधी मार्फत कीटक नाशक दुकाने तपासणी करीत आहेत.
खरे तर हे काम कृषी अधीक्षक किंवा त्या विभागाच्या अधिकाऱ्यांचे आहे. परंतु असे बेकायदेशीर कृत्य नांदेड येथील नवा मोंढा ठिकाणी घडले असून व्यापाऱ्यांचा अवमान करण्यात आला आहे. कंपण्यांनी नेमेलेले वितरक हे परवाना नसतांना बाहेर जिल्ह्यात कीटक नाशके आणि औषधी सरास विक्री करीत असताना मागील ४० ते ५० वर्षात असे कधीच झाले नाही हे आता होत आहे.

या बेकायदेशीर कृत्या विरोधात नांदेड मध्ये भव्य मोर्चा काढणार असल्याचे लेखी पत्र सीटू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर आणि जिल्हा कृषी अधिकारी नांदेड यांना दि.१८ जून रोजी दिले आहे. मोर्चा नवीन मोंढा येथील कृषि अधीक्षक यांना निवेदन देऊन आयटीआय – कला मंदिर- एसपी ऑफिस – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे.

या मोर्चात नांदेड शहरातील मागील वर्षीचे थकीत अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ देण्यात यावे. मौजे वझरा येथील गावठाण विस्तार वाढ योजनेचा अहवाल माहूर तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांनी पाठवावा, संघटनेने व ग्रामसभेने सूचित केलेली जमीन अधिग्रहण करावी.

संजय गांधी योजनेतील तलाठी शेळके यांची बदली करावी. शहरातील नमस्कार चौक येथे सुलभ सोचालय तातडीने बांधण्यात यावे. बजरंग कॉलनी येथे बोअरवेल निर्माण करावेत. अतिवृष्टीत मरण पावलेल्या रामदास लोखंडे यांच्या कुटुंबाचे नांदेड शहरात पुनर्वसन करावे व त्यांच्या मुलास मनपा मध्ये नोकरी द्यावी. आणि २५ लाख रुपयांची आर्थिक मदत करावी.
मारोती केंद्रे यांच्या मुलाच्या मृत्यूची चौकशी करावी व त्यांच्या कुटुंबाचे शहरात पुनर्वसन करावे आदी मागण्या सह इतरही मागण्या करण्यात येणार आहेत.

या मोर्चात मोंढा येथील कामगार, व्यापारी हमाल आणि शेतकरी, पूरग्रस्त मोठ्या संख्येने सामील होणार आहेत.निवेदन देण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात कामगार व व्यापारी उपस्थित होते. या मोर्चाचे नेतृत्व कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.उज्वला पडलवार, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ. लता गायकवाड, कॉ.अशोक बोकेफोड सह सर्व तालुका कमिटीचे पदाधिकारी करणार आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments