नांदेडराजकीय

Mp Ashok Chavhan : विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल!: खा. अशोकराव चव्हाण

नांदेड| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ठोस पाऊल असल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.

या अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक संकल्प व्यक्त केले व ते संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी रोडमॅपही सादर केला, असे त्यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत करताना सांगितले. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, उर्जानिर्मिती, औद्योगिक-आर्थिक विकास व रोजगारनिर्मिती, सामाजिक कल्याण तसेच कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरासह शेतकरी, महिला, युवक सारख्या समाजघटकांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

२०३० पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करणे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतंर्गत २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ करण्याची बहुप्रतिक्षित घोषणा, शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शाश्वत शेतीसाठी ७५ गावांमध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित पथदर्शी प्रकल्प राबवणे, लाडकी बहीण योजना पुढे सुरू ठेवण्याची ग्वाही आणि त्यासाठी पुरेशी तरतूद करणे, आदी निर्णयातून मुख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रातील विकास व सामाजिक न्यायाप्रती आपले धोरण स्पष्ट केल्याचे खा. अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button