Sunday, May 24

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Install HSRP number plates : एचएसआरपी नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा..!

Install HSRP number plates : एचएसआरपी नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा..!

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| ज्या वाहनांची 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेली आहे. त्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नाही. अशा वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरुन 30 एप्रिल 2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज यांनी केले आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम,1989 च्या नियम 50 नुसार वाहनांस एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची तरतूद आहे. तसेच रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या G.S.R. 1162 (E) 04 डिसेंबर 2018 व S.O. 6052(E) दि.06.12.2018 नुसार 01 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. एचएसआरपी नंबर प्लेट विहित वेळेत न बसविल्यास मोटार वाहन कायद्यानुसार परिवहन विभागातर्फे दंड आकारणी करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी दंड ट...
देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार

देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार

महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही...’ असे सांगत शेती, शेतीपूरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला, ‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा अर्थसंकल्प आहे. यातून देशांतर्गत, विदेशी गुंतवणूक, रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील. विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्यात अर्थसंकल्प यशस्वी होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा अकरावा अर्थंसंकल्प विधानसभेत सादर करताना व्यक्त केला. तसेच विधापरिषदेमध्ये वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजमंत्री अजित पवार यांनी वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांन...
Release water from Isapur dam : ईसापुर धरणातून पेनगंगा नदीला पाणी सोडा – शेतकऱ्यांची मागणी

Release water from Isapur dam : ईसापुर धरणातून पेनगंगा नदीला पाणी सोडा – शेतकऱ्यांची मागणी

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| गेल्या काही महिन्यापासून पैनगंगा नदी कोरडी पडल्यामुळे अनेक गावांमध्ये भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे गावांतील पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कारण पैनगंगा नदीपात्रातून होत असलेली रेती चोरीमुळे पाणी टंचाईची समस्या गंभीर होते आहे. याचा नाहक फटका नागरिकांना, मुक्या जनावरांना व पशु पक्षांना आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या अनेक गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांनी इसापूर धरणातून नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे. विदर्भ मराठवाडा सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रातून होत असलेला अविद्या वाळू उपास यामुळे पाणी टंचाईची समस्या वाढू लागली आहे. पाणी टंचाई भासत असल्याने जनतेतून पाणी सोडण्याची मागणी होते आहे. मात्र अद्याप प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. आवश्यकता असतेवेळेस नदीपात्रात पाणी सोडण्य...
Chief Minister Devendra Fadnavis : अद्वितीय असलेल्या महाराष्ट्राला अधिकाधिक उत्तम राज्य बनवू –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : अद्वितीय असलेल्या महाराष्ट्राला अधिकाधिक उत्तम राज्य बनवू –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| महाराष्ट्र हे देशात सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेले राज्य आहे. उद्योग व्यवसायापासून ते शेती, सेवा क्षेत्र व आरोग्य सुविधा यामध्ये राज्य अग्रेसर आहे. पायाभूत सुविधांचा विकास देशात सर्वाधिक महाराष्ट्रमध्येच आहे. अद्वितीय असलेल्या महाराष्ट्राला अधिकाधिक उत्तम राज्य बनविण्याची ग्वाही देत विरोधकांनी राज्यकारभारासाठी आपल्याकडील चांगल्या सूचना देण्याची अपेक्षाही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपाल यांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या उत्तरादरम्यान व्यक्त केली. उच्चांकी सोयाबीन खरेदी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहिले असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सोयाबीनसाठी ४८९२ इतका हमीभाव जाहीर करण्यात आला होता. राज्य शासनाने 562 केंद्रावर सोयाबीनच्या खरेदीची व्यवस्था केली.  सोयाबीन खरेदीला केंद्र सरकारने दोन वेळा मुदतवाढ  दिली असून तिसरी मुदतवाढही...
Chief Minister Devendra Fadnavis : महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कुठेही कमी पडणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Chief Minister Devendra Fadnavis : महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कुठेही कमी पडणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

नांदेड, महाराष्ट्र
मुंबई| महिलांच्या सुरक्षेसाठी शासन कडक कायदे करत आहे. कायद्याच्या अंमलबजावणी बरोबरच समाजात महिलांप्रति असलेली मानसिकता देखील बदलणे गरजेचे आहे. महिलांच्या तक्रारींचे तातडीने निरसन करण्यात येत आहे. समाज माध्यमांवर मॉर्फिंग आणि डीपफेक व्हिडिओंच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करीत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महिला दिनानिमित्त महिला पत्रकारांसोबत साधलेल्या संवादादरम्यान दिली. जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला पत्रकारांना शुभेच्छा देऊन सह्याद्री अतिथीगृह येथे संवाद साधताना महिलांच्या सशक्तीकरणासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे मांडले. महिलांना विविध क्षेत्रांमध्ये भेडसावणाऱ्या अडचणी, त्य...
Minal Karanwal : मानसिकता बदलविण्यासाठी महिलांनीच महिलांची साथ देणे आवश्यक : मिनल करनवाल

Minal Karanwal : मानसिकता बदलविण्यासाठी महिलांनीच महिलांची साथ देणे आवश्यक : मिनल करनवाल

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| महिलांचे स्वतंत्र अस्तित्व घराघरातून निर्माण करण्यासाठी बालिका पंचायत हा उपक्रम पथदर्शी ठरत आहे. या उपक्रमाला सुरूवात केल्यानंतर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी याचे स्वागत केले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात अनेक गावांचा आम्ही समावेश केला असून या माध्यमातून महिला सबळीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणात राबविली जाते. समाजाची मानसिकता बदलविण्यासाठी महिलांच्या या उपक्रमाला घराघरातील महिलांचा पाठिंबा वाढणे आवश्यक असल्याचे, प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त आज नांदेड येथे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभाग व स्वच्छता विभागाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी जलजीवन मिश...
Shri Parmeshwar has come in full swing : धार्मिक कार्यक्रमानंतर श्री परमेश्वराच्या यात्रेला आलीय रंगत; उंच आकाश पाळणे, मनोरंजन व इतर साहित्याची दुकाने दाखल

Shri Parmeshwar has come in full swing : धार्मिक कार्यक्रमानंतर श्री परमेश्वराच्या यात्रेला आलीय रंगत; उंच आकाश पाळणे, मनोरंजन व इतर साहित्याची दुकाने दाखल

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| संबंध भारतात प्रसिद्ध असंलेल्या हिमायतनगर येथील श्री परमेश्वराच्या यात्रेला महाशिवरात्रीपासून सुरुवात झाली असून, ही यात्रा 12 मार्च म्हणजे होळी रंगपंचमी पर्यंत चालणार आहे. यात्रेच्या सुरुवातीच्या सात दिवसाच्या सत्रात अखंड हरिनाम सप्ताह, विना पारायण सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आदींसह दररोज कीर्तन व इतर धार्मिक कार्यक्रम भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. यात्रेत विविध प्रकारचे उंच आकाश पाळणे, मनोरंजन व इतर साहित्याची दुकाने दाखल झाल्याने आता खऱ्या अर्थाने यात्रेला रंगत आली आहे. महाशिवरात्री निमित्ताने विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक आदी राज्यातील लाखो भावी भक्तांनी उपस्थित होऊन वाढोणा येथील श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. परमेश्वर मूर्तीबाबत सांगितले जाते कि, हि मूर्ती साडेसातशे वर्षांपूर्वी येथील शेतात नांगरणी करताना शेतकऱ्याला आढळून आली होती. त...
The grand Shankarpat competition : श्री परमेश्वर यात्रेतील भव्य शंकरपट स्पर्धेचे माजी आमदार जवळगावकर यांच्या हस्ते झाली थाटात सुरुवात  

The grand Shankarpat competition : श्री परमेश्वर यात्रेतील भव्य शंकरपट स्पर्धेचे माजी आमदार जवळगावकर यांच्या हस्ते झाली थाटात सुरुवात  

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार। गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या हिमायतनगर येथील श्री परमेश्वराच्या महाशिवरात्री यात्रा उत्सवाला आता रंग चढला आहे. आज दिनांक ०७ शुक्रवारी शेतकरी व बळीराजासाठी महत्त्वाचा मानला जाणारा बैलगाडी शर्यतीचा कार्यक्रम म्हणजेच शंकरपट स्पर्धेची सुरुवात ( The grand Shankarpat competition during the Shri Parmeshwar Yatra ) माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते झाली आहे. पहिल्या दिवशी जवळपास 30 ते 40 स्पर्धकांनी या शंकरपट स्पर्धेत सहभाग घेतला असून, शंकरपटाच्या मैदानावर धावणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या चित्त थरारक दृश्याने अनेकांचे डोळ्याचे पारणे फिटले आहे. हिमायतनगर येथील श्री परमेश्वर यात्रेत शेतकरी राजासाठी केवळ एकच पशुप्रदर्शन स्पर्धा होत होती. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर तब्बल अकरा वर्षानंतर हिमायतनगर येथील श्री परमेश्वर महाराजांच्या महाशिवरात्री यात्...
Rohi’s car hits  : रोहीची कारला धडक रोही गंभीर; सुदैवाने जीवितहानी नाही

Rohi’s car hits : रोहीची कारला धडक रोही गंभीर; सुदैवाने जीवितहानी नाही

नांदेड, महाराष्ट्र
रोहीची कारला धडक रोही गंभीर; सुदैवाने जीवितहानी नाही श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर शहरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या श्री मंजुनाथ पेट्रोल पंपा समोरील जंगलातून अचानकपणे रोही या जंगली प्रांण्याचे चालत्या कारला प्रचंड जोराची धडक दिल्याने कारच्या समोरील काचासह वरील भागाचे प्रचंड नुकसान झाले. तर रोहीच्या मानेला व पाठीला गंभीर दुखापत झाल्याने रोही आत्यअवस्थेत रस्त्यावर पडल्याची घटना पाहून नागरिकांनी वनविभागाला पाचारण केल्याची घटना दि 6 मार्च रोजी रात्री 9.30 वाजता घडली आहे. माहूर तालुक्यातील जंगलातील पानवठे आटल्याने जंगली जनावर पाण्याचा शोधात माहूर शहरासह खेड्यापाड्यातील गाव वस्तीत फिरत असून माहूर शहरातील राष्ट्रीय महामार्गावर नगरपंचायत डम्पिंग ग्राउंड कडून राष्ट्रीय महामार्गावर अचानक रोही हा जंगली प्रांणी आल्याने त्याची कारला जबर धडक बसली त्यामुळे गंभीर जखमी होऊन रोही खाली पडला...
Thirsty Rohi fell into a dry well : तहानेने व्याकुळ रोहि कोरड्या विहिरीत पडला; तब्बल पाच तासाने झाली सुटका

Thirsty Rohi fell into a dry well : तहानेने व्याकुळ रोहि कोरड्या विहिरीत पडला; तब्बल पाच तासाने झाली सुटका

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
सोनारी फाटा/हिमायतनगर, शेख खय्युम| भोकर- हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे सोनारी गावानजीकच्या टोलनाक्या जवळील एका शेतकऱ्याच्या कोरड्या विहिरीमध्ये पाण्याच्या शोधात आलेला रोजी सकाळी पडला होता. याची माहिती देऊनही तब्बल ५ तासानंतर वनविभागाने त्या रोहिला बाहेर काढून वनाधिवासात सोडले आहे. त्यामुळे बाहेर पाडण्यासाठी तहानेने व्याकुळ झालेल्या रोहिला कासावीस होत धडपडत राहावे लागले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील पाणी पातळी खोल गेली असून, जंगलातील पाणवठे आटले आहेत. त्यामुळे पाण्याच्या शोधात अनेक वन्यप्राणी गावकुशीकडे धाव घेत असून, काही प्राणी शेतातील विहिरीजवळ पाणी शोधात तहान भागविण्यासाठी सैरवैर धावत आहेत. असाच एक रोही जातीचा वन्यप्राणी दिनांक ०५ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पाण्याच्या शोधात आला होता. दरम्यान तोल जाऊन भोकर - हिमाय...
error: Content is protected !!