Wednesday, May 13

कृषी

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

fog’s empire; Threat to cotton, tur and orchards : धुक्याच्या साम्राज्याने शेतकऱ्यांसह नागरिक हैराण; कापूस, तूर व फळबागांना धोका -NNL

fog’s empire; Threat to cotton, tur and orchards : धुक्याच्या साम्राज्याने शेतकऱ्यांसह नागरिक हैराण; कापूस, तूर व फळबागांना धोका -NNL

कृषी, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या दोन दिवसापासून सकाळी पडलेल्या भयंकर धुक्याच्या साम्राज्याने वाहनधारक, पदाचार्यासह शेतकरी नागरिक हैराण झाले. दि.२३ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत सुरु असलेल्या धुक्यामुळे पुन्हा एकदा शेतकर्यांना पिकाची चिंता लागली असून, प्रामुख्याने कापूस, तूर व फळबागांना धोका होण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळाला नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात..! जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तात्काळ शासनाने शेतकऱ्याना सरसकट मदत दिवाळीपूर्वी द्यावी अशी म्हणी देखील होऊ लागली आहे. एकीकडे राज्यात नैसर्गिक आपत्ती, गारपीट, वादळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळात तडाखा, यामुळे शेतकरी व प्रशासन त्रस्त आहे. त्यातच परतीच्या पावसाने दिलेली जोरदार हजेरी यामुळेच कि काय..? आता दोन दिवसापासून नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर सह बहुतांश त...
A farm laborer died due to lightning : अंगावर विज पडल्याने शेतमजुराचा मृत्यू  ; शेळगाव नरसिंह येथील घटना -NNL

A farm laborer died due to lightning : अंगावर विज पडल्याने शेतमजुराचा मृत्यू ; शेळगाव नरसिंह येथील घटना -NNL

नांदेड, कृषी
देगलूर, गंगाधर मठवाले| शहरासह तालुक्यात सोमवार ता .२१ रोजी दुपारनंतर हवामानात बदल होऊन ढगाळ वातावरण झाले होते. काही भागात पाऊसही झाला त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले. दरम्यान विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने शेतावर फवारणीस गेलेल्या शेतमजुराच्या अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला. हि घटना देगलूर तालुक्यातील शेळगाव नरसिंह येथे सोमवारी दुपारी १२:३० च्या दरम्यान घडली. देगलूर तालुक्याच्या ग्रामीण भागात दुपारनंतर वातावरणात बदल झाला. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला, तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मोठा पाऊस झाला. यामुळे शेतातील पिकांची नुकसान झाले .तमलुर, शेळगाव ,मेदनकल्लूर,शेवाळा, सांगवी या भागात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. शेळगाव नरसिंह येथील बसवंत मारुती गुडफळे ( वय ४०) हा शेतमजूर शेतावर फवारणीचे काम करीत असताना अचानक अंगावर विज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या ...
Rabi season : रब्बी हंगामासाठी पाणीपाळी सोडण्याचे नियोजन -NNL

Rabi season : रब्बी हंगामासाठी पाणीपाळी सोडण्याचे नियोजन -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) नांदेड या विभागांतर्गत असणाऱ्या निम्न मानार मोठा प्रकल्प, उर्ध्व मानार मध्यम प्रकल्प, करडखेड मध्यम प्रकल्प, कुंद्राळा मध्यम प्रकल्प, पेठवडज मध्यम प्रकल्प, महालिंगी मध्यम प्रकल्प, कुदळा मध्यम प्रकल्प, 1 कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा व 50 लघु प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांना कळविण्यात आले आहे की, सदर नमूद प्रकल्पांवर रब्बी हंगाम सन 2024-2025 राबविण्याचे नियोजित आहे. सर्व धरणांत 15 ऑक्टोबर 2024 रोजीच्या स्थितीनुसार पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून, उपलब्ध पाणी साठ्याच्या अनुषंगाने प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात रब्बी हंगाम पूर्ण क्षमतेने राबविण्याचे नियोजित आहे. सदर नियोजनास आवश्यकतेनुरुप कालवा सल्लागार समितीची मंजूरी मिळाल्यानंतर त्याप्रमाणे पाणीपाळी सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यानुषंगाने सर्व संबंधित लाभधारकांना आवाहन करण्यात येते की, हंगाम सुरू...
rabi season crops : रब्बी हंगामातील पिकांसाठी 15 नोव्हेंबरपर्यत पाणी अर्ज करण्याचे आवाहन -NNL

rabi season crops : रब्बी हंगामातील पिकांसाठी 15 नोव्हेंबरपर्यत पाणी अर्ज करण्याचे आवाहन -NNL

नांदेड, कृषी
नांदेड| शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या धरणामध्ये उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता चालू रब्बी हंगाम सन 2024-25 मध्ये अटीच्या अधीन राहून नमुना नंबर 7 वर पाणी अर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. ज्या लाभधारकांना रब्बी हंगामात नमुना नं. 7 वर भुसार पिके, चारा पिके इत्यादी पिकांना पाणी घ्यावयाचे आहे, त्यांनी आपले नमुना नंबर 7 चे पाणी अर्ज जवळच्या शाखा कार्यालयात 15 नोव्हेंबर 2024 पर्यत आवश्यक त्या कागदपत्रासह भरून द्यावेत. मुदतीनंतर येणारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे. हंगाम सुरु होण्यापुर्वी पुढील अटी व शर्तीची पूर्तता होणे आवश्यक रब्बी हंगामी पिकांसाठी कालव्याचे प्रवाही/मंजूर उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहित नमुन्यात 15 नोव्हेंबर 2024 पूर्वी संबंधित शाखा कार्यालयात माहिती ...
In Himayatnagar taluka : हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून  वाचलेल्या सोयाबीनच्या काढणीस प्रारंभ -NNL

In Himayatnagar taluka : हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून  वाचलेल्या सोयाबीनच्या काढणीस प्रारंभ -NNL

कृषी, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार। तालुक्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या नगदी पीक सोयाबीनच्या काढणीस प्रारंभ झाला असून, खरीप पेरणीतील सोयाबीन काढणी सुरु झाली आहे. परंतू हाती आलेल्या उत्पादनात विक्रमी घट निर्माण झाली असून, प्रती बॅग ५ ते  ६ पोते भरत असले तरी सोयाबीनची प्रतवारी खराब असल्याचे शेतकऱ्यांतून सांगीतले जात आहे. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत हाती आलेल्या उत्पादनात झालेली घट शेतकऱ्याला कर्जाच्या खाईत लोटणारी ठरत असून, व्यापाऱ्याकडून कमी भाव दिला जात असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात वाढ होत आहे.   हिमायतनगर तालुक्यात ४९ हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर भौगोलिक क्षेत्र असून, ३९ हजार सहाशे चौर्हेचाळीस हेक्टरवर खरिपाची पेरणी करण्यात आली आहे. नगदी पीक सोयाबीन सर्वाधिक १९ हजार आठशे सत्यान्नव हेक्टरवर पेरा करण्यात आलेला आहे. तर शेतकऱ्याचं पांढरं सोनं समजलं जाणाऱ्या कपाशीची लागवड १४ हजार दोनशे चोवीस...
Farmers Asud Morcha : छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी असूड मोर्चा – NNL

Farmers Asud Morcha : छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी असूड मोर्चा – NNL

कृषी, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यात युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आणि स्वराज्य पक्षाच्या आयोजनात हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी असूड मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, नांदेड येथून झाली आणि हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे समाप्त झाला. या मोर्चात शेतकऱ्यांच्या अनेक महत्त्वपूर्ण मागण्या सरकारच्या कानावर घालण्यात आल्या, ज्यात पिकांचे भाव, नुकसान भरपाई आणि विविध योजनांशी संबंधित मुद्द्यांचा समावेश होता. या मोराचातील मुख्य मागण्या सोयाबीनसाठी ₹8,500 प्रति क्विंटल दर मिळावा, कापूससाठी ₹11,000 प्रति क्विंटल दर मिळावा, ऊसासाठी ₹3,500 प्रति टन दर मंजूर करावा, तिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई 72 तासांच्या आत देण्याचे आश्वासन दिले असताना अद्याप ती देण्यात आलेली नाही, नदीकाठच्या शेतकऱ्यांना दुहेरी अनुदान देण्यात यावे, प्रधान...
The Chief Minister worshiped the cow ; मुख्यमंत्र्यांनी केले गोमातेचे पूजन – NNL

The Chief Minister worshiped the cow ; मुख्यमंत्र्यांनी केले गोमातेचे पूजन – NNL

नांदेड, कृषी
नांदेड| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड येथील महिला सशक्तीकरण कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच गोमातेला पुष्पहार घालून पूजन केले. महाराष्ट्र शासनाने गोमातेला नुकतीच राज्य मान्यता दिली आहे. या पूजन कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या लाल कंधारी, मथुरा लभाण, देवणी गाय या गोमातेचे पूजन केले. यावेळी लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील परसराम सापनर यांची लाल कंधारी, किनवट तालुक्यातील सावरगाव तांडा येथील संतोष पेळे यांची मथुरा लभाण व नांदेड येथील श्रीरंग डोईफोडे यांच्या देवणी गायीचा समावेश आहे. यावेळी मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, भीमराव केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करन...
Nanaji Deshmukh Agriculture Sanjeevani Yojana : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा दुसरा टप्पा राबविण्यास मंत्रीमंडळाची मंजुरी: नव्या ७ हजार गावांचा समावेश – धनंजय मुंडे -NNL

Nanaji Deshmukh Agriculture Sanjeevani Yojana : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा दुसरा टप्पा राबविण्यास मंत्रीमंडळाची मंजुरी: नव्या ७ हजार गावांचा समावेश – धनंजय मुंडे -NNL

हिंगोली, कृषी, नांदेड
मुंबई| नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणे केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक योजनेस मंजुरी, राज्यातील कृषी विद्यापीठांमधील प्रकल्पग्रस्तांच्या पदभरतीस मंजुरी आणि बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन केंद्रास अतिरिक्त निधी देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. राज्यातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास सहाय्य करणे या उद्देशाने राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 5284 गावांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यात सद्यस्थितीत समाविष्ट असलेल्या 16 जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली आदी 2...
Heavy rain disrupts : दमदार पावसाने सोयाबीन काढणीत व्यत्यय, कापूस, सोयाबीन खराब होण्याचा धोका – NNL

Heavy rain disrupts : दमदार पावसाने सोयाबीन काढणीत व्यत्यय, कापूस, सोयाबीन खराब होण्याचा धोका – NNL

कृषी, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| तालुक्यात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरणाला सुरुवात होवून दि.८ आॅक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान केले आहे.अशातच काल दुपारी १ वाजताच्या व दुपारी ३ च्या दरम्यान पून्हा जोरदार अर्धा तास पाऊस झाला. दरम्यान, काढणी सुरू असलेले सोयाबीन जाग्यावरच भिजल्याने अनेक शेतकर्‍याचे नूकसान झाल्याचे बोलल्या जात आहे. मंगळवारी व गुरुवारी पावसाने दिलेल्या तडाख्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.यात कापूस आणि सोयाबीन असलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.माहूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांची लागवड केली जाते. यावर्षी चांगला भाव मिळणार, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. परंतु या दोन्हीही पिकांचे पावसाने आता मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. कापसाच्या वाती आणि सोयाबीनची माती अ...
NCCF ; एनसीसीएफ मार्फत आधारभूत दरानुसार मुग, उडीद व सोयाबीन खरेदी – NNL

NCCF ; एनसीसीएफ मार्फत आधारभूत दरानुसार मुग, उडीद व सोयाबीन खरेदी – NNL

कृषी, नांदेड
नांदेड | महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड व एनसीसीएफ कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने हंगाम 2024-25 मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेड व एनसीसीएफ मार्फत मुग, उडिद व सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणी 1 ऑक्टोबरपासुन सुरु झाली आहे. प्रत्यक्षात मुग, उडीद खरेदी 10 ऑक्टोबरपासून आणि सोयाबीन खरेदी 15 ऑक्टोबर 2024 पासुन सुरु करण्यात येणार आहे. एनसीसीएफद्वारे नांदेड जिल्ह्यासाठी एकूण 14 खरेदी केंद्र मंजूर आहेत. त्याच्यामार्फत शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत मुग, उडिद व सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मुग, उडिद व सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. सदर योजना ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी राबविण्यात येत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मुग, उडिद व सोयाब...
error: Content is protected !!