कंधार l तालुक्यातील मौजे बारूळ येथे महामानव विश्वरत्न बोधिसत्व अर्थतज्ञ कायदे पंडित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती ३० एप्रिल रोजी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. सकाळी पहिल्या सत्रामध्ये पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण बारूळ नगरीचे उपसरपंच शंकरराव नाईक यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा बारुळ नगरीचे सरपंच सौ जनाबाई मनोहर वाघमारे यांनी भूषविले.


या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. पंचायत समिती सदस्य दिगंबर पाटील वडजे, संजय पाटील जाधव तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर वाखरडे, वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश दुलेवाड, ग्राम विकास अधिकारी डॉ. व्ही. जे. आदमपूरकर आधीची उपस्थिती होती. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मारुती पाटील मजरे, नारायण सावकार कुंभारे, अनिल सावकार इतकापले, उदय पाटील जाधव, देविदास पाटील मजरे, नामदेव पाटील मजरे, गोविंद शिंदे, रुखमाजी कोल्हे, जगन कांबळे, जयराम कांबळे, कैलास वाखरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


प्रमुख वक्ते म्हणून प्रा डॉ अनंत राऊत सविधान संस्कृती संकलन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भीम अनुयायांना संविधान विषयक जनजागृती निर्माण केली. तसेच दुसरे वक्ते ह. भ. प. मधुकर महाराज बारूळकर यांनी उपस्थित जनसमुदायाला आपल्या वाणीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी सखोल मार्गदर्शन केले. व भाषणानंतर भिम जयंती मंडळाच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला.

दुसऱ्या सत्रामध्ये ठीक चार वाजता गावच्या प्रमुख मार्गाने तथागत गौतम बुद्ध, व महामानव बोधिसत्व परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैल चित्राची भव्य मिरवणूक पोलीस पाटील संजय पाटील जाधव व तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर वाखरडे यांच्या नियंत्रणाखाली काढण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, उपाध्यक्ष शिलानंद कांबळे, सचिव उद्धव राहटे, सहसचिव नंदकुमार धडेकर, कोषाध्यक्ष सदाशिव बनसोडे व सर्व भीम जयंती मंडळाचे सदस्य बौद्ध बांधव यांनी परिश्रम घेतले. तसेच काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उस्माननगर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी यांचा चौख बंदोबस्त होता.
