Monday, July 6

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Chief Minister Baliraja Free Power Scheme | शेतकऱ्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना -NNL

Chief Minister Baliraja Free Power Scheme | शेतकऱ्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना -NNL

नांदेड, लेख
भारतातील शेती मुख्यत: पावसावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षात जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्यांचे परिणाम मात्र शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. वातावरणाच्या अनियमिततेमुळे प्रत्यक्ष पिक हंगामावर त्यांचा प्रत्यक्ष परिणाम होवून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. शेतकऱ्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्यातील 7.5 एच.पी पर्यतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत व दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राज्य शासनाने 25 जुलै 2024 रोजी अंमलात आणली आहे. महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या वेळी 10/8 तास किंवा दिवसा 8 तास थ्री फेज वीजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर येणाऱ्या व...
अल्पसंख्यांक शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजना 25 सप्टेंबर पूर्वी प्रस्ताव सादर करा -NNL

अल्पसंख्यांक शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजना 25 सप्टेंबर पूर्वी प्रस्ताव सादर करा -NNL

करियर, नांदेड
नांदेड| राज्य शासनाने अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आयटीआय, अपंग शाळा यांच्यासाठी पायाभूत सोयी सुविधा अनुदान योजना जाहीर केली आहे. मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शिख व पारसी समुदायाच्या शाळांसाठी ही योजना असून अनुदानासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. शासन निर्णयानुसार अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळा, यांच्याकडून पायाभूत सुविधा उभारण्यासाठी दोन लाख कमाल मर्यादित अनुदान दिले जाते.सन 2024 25 या आर्थिक वर्षासाठी हे अनुदान शाळांना मिळू शकते. त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. हे अनुदान मिळवण्यासाठी शासन मान्यता प्राप्त अपंगांच्या शाळांमध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्यांक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे.या योजनेतून शाळेच्या इमारतीचे नूत...
National Lok Adalat | राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 10 हजार 323 प्रकरणे समोपचाराने निकाली -NNL

National Lok Adalat | राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 10 हजार 323 प्रकरणे समोपचाराने निकाली -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार 27 जुलै 2024 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्हयामध्ये एकुण 10 हजार 323 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली असून रक्कम 23 कोटी 28 हजार 829 इतक्या रकमेबाबत विविध प्रकरणांत तडजोड झाली. यामध्ये दिवाणी, फौजदारी, धनादेश अनादरीत झालेली प्रकरणे, बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसानभरपाई, भूसंपादन, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे प्रकरणे तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व ग्राहक तक्रार मंच येथील प्रलंबीत प्रकरणांचा व नांदेड वाघाळा महानगर पालिका, पंचायत समिती व ग्रामपंचायतींचे वसुली प्रकरणे, विविध बॅंकांचे तसेच विद्युत प्रकर...

नांदेडच्या श्री गुरुजी रुग्णालयास शासकीय भाग भांडवल -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड| येथील श्री गुरुजी रुग्णालयास विशेष बाब म्हणून शासकीय भाग भांडवल उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हे रुग्णालय नंदीग्राम वैद्यकीय सहकारी संस्थेमार्फत सहकार तत्त्वावर चालविले जाते. संस्थेने एक कोटी भाग भांडवल जमा करून तसेच 6 कोटी कर्ज घेऊन रुग्णालय सुरु केले आहे. मात्र कर्जाच्या बोजामुळे रुग्णालय तोट्यात गेले असून जवळपास 200 कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे. रुग्णसेवा आणि सामाजिक संवेदनशीलतेमुळे रुग्णालय चालविणे आवश्यक असल्यामुळे संस्थेला 1 : 9 याप्रमाणे 9 कोटी भाग भांडवल स्वरुपात 10 वर्षात शासकीय भाग भांडवल अंशदान स्वरुपात अर्थसहाय देण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली. शासकीय भाग भांडवलाची परतफेड पुढील 8 वर्षात समान हप्त्यात करावी. ही भाग भांडवलाची रक्कम बिनव्याजी राहील. तथ...

मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय -NNL

धार्मिक, मराठवाडा
मुंबई| मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार असून लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या जमिनी मूळ मालकाला मिळणार आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यामुळे 60 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न निकाली निघणार आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी अशाच प्रकारचा निर्णय विदर्भासाठी घेतला होता आणि लाखो शेतकऱ्यांना कसत असलेल्या जमिनींचा मालकी हक्क मिळाला होता. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमधील या जमीनींबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. याचा विचार करून या खालसा झालेल्या इनाम जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ...
तिर्थक्षेत्र बळीरामपूर नांदेड येथील मंदिराच्या शासकीय महापूजेबाबतच्या निवेदनाची शासनाने घेतली दखल -NNL

तिर्थक्षेत्र बळीरामपूर नांदेड येथील मंदिराच्या शासकीय महापूजेबाबतच्या निवेदनाची शासनाने घेतली दखल -NNL

नांदेड, धार्मिक
नविन नांदेड| जगभरातील चर्मकार समाजाचे आराध्य दैवत, महाराष्ट्रातील संत गुरु रोहिदास महाराज मंदिर प्रस्तावित ग्रामीण तिर्थक्षेत्र वर्ग ब बळीरामपूर नांदेड या 40 वर्षापूर्वीच्या मंदिराची महापूजा दरवर्षी माघ पौर्णिमेस जयंतीनिमित्ताने व पुढच्या वेळेस 12 फेब्रुवारी 2025 रोज बुधवार शासनाच्या पुढाकाराने एक विशेष बाब म्हणून मा. पालकमंत्री नांदेड, मतदार संघातील मा. आमदार यांच्या शुभहस्ते, मा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या उपस्थितीमध्ये ठेवण्याची व्यवस्था व्हावी असे निवेदन वेळोवेळी सन 2020 पासून करण्यात येत असताना राज्य शासनाचे लाडके उपमुख्यमंत्री मा.ना. श्री अजितदादा पवार यांनी सदरील निवेदनाची योग्य ती दखल घेऊन मा. जिल्हाधिकारी नांदेड यांना पुढील उचित कार्यवाहीस्तव कळविले असल्याचे मा. जिल्हाधिकारी नांदेड यांनी त्यांच्या स्वाक्षरीने त्यांच्या कार्यालयाचे पत्र क्रं. 2024/जिनिस/का-3/865 दि. 11.07.2024 अन्...
Nana Patole | लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी जोमाने काम करा: नाना पटोले – NNL

Nana Patole | लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी जोमाने काम करा: नाना पटोले – NNL

राजकीय
मुंबई| भारतीय जनता पक्ष धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करत आहे. भाजपा देश तोडण्याचे काम करत असताना राहुल गांधी मात्र देश जोडण्याचे काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीत जनता काँग्रेस व इंडिया आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. विधानसभेची निवडणूक तीन महिन्यावर आली आहे, लोकसभेत चांगले यश मिळाले म्हणून गाफील राहू नका विधानसभा निवडणुकीसाठीही मेहनत करा, जनतेपर्यंत जा व काँग्रेस व महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी काम करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आढावा बैठकीला मार्गद...
Hang ‘Love Jihadya’ in Bharchouk ! उरणमधील यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍या ‘लव्ह जिहाद्या’ला भरचौकात फाशी द्या -NNL

Hang ‘Love Jihadya’ in Bharchouk ! उरणमधील यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍या ‘लव्ह जिहाद्या’ला भरचौकात फाशी द्या -NNL

महाराष्ट्र
मुंबई| महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे, मात्र सध्या ‘लव्ह जिहाद’च्या धोक्यामुळे हिंदू युवती आणि महिला अजूनही असुरक्षित आहेत आणि त्यांच्या निर्घृण हत्या सुरूच आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या आधी ‘बहिणींना सुरक्षा द्या!’ बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करावा, अशी आग्रही मागणी मुंबईतील दादर पूर्व येथील रेल्वे स्थानकाजवळ ३० जुलै या दिवशी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने आयोजित ‘हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलना’त करण्यात आली. उरण येथील कु. यशश्री शिंदे (वय २२) हिची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमा फासणारी हत्या करण्यात आली. कु. यशश्रीची हत्या करणार्‍या नराधम आरोपीला तात्काळ भरचौकात फाशी देण्यात यावी, ही मागणीही या वेळी करण्यात आली. ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या आंदोलनात वज्र दल, मनसे, मानव से...
Kirtan by Habhap Vishal Maharaj Khole | लोह्यात चिखलीकरांच्या वाढदिवसा निमित्त हभप विशाल महाराज खोले यांचे ३ तारखेला किर्तन -NNL

Kirtan by Habhap Vishal Maharaj Khole | लोह्यात चिखलीकरांच्या वाढदिवसा निमित्त हभप विशाल महाराज खोले यांचे ३ तारखेला किर्तन -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| जिल्ह्याचे लोकनेते माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ३ ऑगस्ट राजी लोहा शहरातील व्यंकटेश गार्डन येथे सांयकाळी चार वाजता सुप्रसिद्ध किर्तनकार हभप विशाल महाराज खोले यांच्या किर्तननाचा कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आला आहे. तेव्हा या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजन दीपक पाटील कानवटे, पत्रकर केशव पवार, आवीनास पवार यांन केले आले आहे. जिल्ह्याचे नेते प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन जिल्हयात करण्यात आले आहे. लोह्यात हभप विशाल महाराज खोले याचे किर्तन होणार आहे या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे माजी खासदार चिखलीकर व युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा सोहळा ३ तारखेला सायंकाळी चार वाजता होणार आहे. यावेळी ह भ प आत्माराम महाराज रायवाडीकर, ह भ प लक...
वरिष्ठानी लक्ष देण्याची गरज…. महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे तारांची चोरी -NNL

वरिष्ठानी लक्ष देण्याची गरज…. महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे तारांची चोरी -NNL

नांदेड, क्राईम
उस्माननगर, माणिक भिसे। कंधार तालुक्यातील शिराढोण येथे दि.28जुलै रोजी रात्रीच्या सुमारास जवळपास सव्वालाख रुपये किमतीच्या तारांची चोरी झाल्याचे समजते पण तार चोरट्यानी नेला कि महावितरनाणे नेला? अशी चर्चा परिसरातील शेतकऱ्यातून ऐकवायास मिळत आहे. या कॉपर तार चोरीमुळे शिराढोण -गोळेगाव गावांतील शेतकऱ्यांचा शेतीतील विद्युत पुरवठा बंद झाला आहे परिसरातील काही जमिनी सुपीक असल्यामुळे शेतातील स्प्रिंकलर लावून चालवलेला प्रयत्नही यामुळे बंद पडला आहे. त्यामुळे शेतातील लाखमोलाचे पीक करपू लागले आहे. चोरीच्या या प्रकारामुळे या भागातील जनावरांचा पिण्याच्या पाण्याचीही मोठी गैरसोय होत आहे. चोरीला गेलेल्या या तारांमुळे खंडित झालेला वीजपुरवठा नियमित करण्यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आद्यप तरी कुठले प्रयत्न करीत नसल्याचे दिसत आहे. तालुक्यातील शिराढोण -गोळेगाव परिसरातील शेतकरी अनेक दिवसापासून ट्रीप होणाऱ्या...
error: Content is protected !!