Homeकृषीजायकवाडी धरणातून आज 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; गोदावरीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जायकवाडी धरणातून आज 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; गोदावरीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नांदेड/पैठण, प्रतिनिधी| जायकवाडी धरण (नाथसागर जलाशय) येथून आज दि. 4 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5.00 ते 6.00 वाजेदरम्यान धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार या विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ अथवा घट करण्यात येऊ शकते, अशी माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाने दिली आहे.

प्रशासनाने नागरिकांना गोदावरी नदीपात्रात प्रवेश न करण्याचे आवाहन केले असून नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे सांगितले आहे. संभाव्य पाणीपातळीत वाढ लक्षात घेऊन कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होणार नाही यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जायकवाडी पाटबंधारे विभागाचे आवाहन : गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments