
हिमायतनगर। येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिराजीक असलेल्या पोलीस ठाण्यात मागील अनेक महिन्यांपासून जमा असलेली वाहने कागदपत्र, पुरावे सादर करून घेऊन जावी. असे आवाहन हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी केले आहे. अन्यथा या वाहनांचा लिलाव केला जाईल असेही त्यांनी म्हंटले आहे.


नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या परिसरात झालेल्या अपघातातील आणि काही ठिकाणी बेवारस स्थितीत आढळून आलेली चारचाकी, दुचाकी, तीनचाकी वाहने पोलीस स्थानकात जमा करण्यात आली आहेत. सदर वाहने अनेक महिन्यांपासून पोलीस ठाण्याच्या आवारात आहेत. याबाबत अनेकदा सूचना देऊन आपली वाहने घेऊन नेण्यात असमर्थता दर्शविली आहे.

त्यामुळे येथील वाहने ज्यांची कुणाची आहेत त्यांनी आपल्या गाडीचे कागदपत्रे व इतर पुरावे सादर करून घेऊन जावीत. अन्यथा येत्या तीन दिवसात या वाहनाचा कायदेशीर लिलाव प्रक्रिया करण्यात येईल. आणि त्यानंतर वाहनांची जबाबदारी ज्यांची त्यांच्यावर राहील असे आवाहन हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी केले आहे.





