नांदेडलाइफस्टाइल

Thirst will be quenched : टंचाईग्रस्त देगलूर, मुखेड तालुक्याची तहान भागणार

नांदेड| लेंडी आंतरराज्य प्रधान प्रकल्प हा महाराष्ट्र व तेलंगणा राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे. या प्रकल्पाची पाणी वापर क्षमता 5.23 टीएमसी इतका असून प्रकल्पामुळे 26 हजार 924 हेक्टर इतके क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

काल 26 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्या उपस्थितीत लेंडी प्रकल्पाच्या घळभरणीबाबत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये नागरी सुविधांचा आढावा घेण्यात आला. तसेच कामाच्या नियोजनाबाबत माहिती घेण्यात आली. प्रकल्पग्रस्तांसाठी वाढीव कुटूंब पुर्नवसन अनुदान वाटप करणे, शेतकऱ्यासाठी सानुग्रह अनुदान वाटप करणे व पहिल्या टप्प्यातील 7 गावातील भुखंड वाटप करणे इत्यादी गोष्टीचा परामर्श घेण्यात आला.

या बैठकीस उपजिल्हाधिकारी पुर्नवसन मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अधिक्षक अभियंता देगलूर दाभाडे, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, कार्यकारी अभियंता, लेंडी प्रकल्प देगलूरचे विवेकानंद तिडके, कार्यकारी अभियंता महावितरण पेंडारकर, तहसिलदार मुखेड जाधव, पोलीस निरीक्षक श्री. तिडके, श्री. टाक शेतकरी संघटनेचे गुणवंत पाटील हंगरगेकर, सरपंच भिंगोली गाढवे, उपसंरपंच सोनकांबळे आदीची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले बैठकीचा समारोप करताना देगलूर व मुखेड तालुक्यातील पाणी टाचाईची परिस्थीती विशद केली. येणाऱ्या काळात देगलूर व मुखेड तालुक्याला पाण्याची भीषण पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता असल्यामुळे आता आगामी काळात याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. देगलूर, मुखेड तालुक्याची तहान भागविण्यासाठी आंतरराज्यीय लेंडी प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक आहे.

लेंडी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व आवश्यक गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. घळभरणी केल्यास धरणात 145.15 दलघमी 5.23 टीएमसी उपयुक्त पाणी साठा निर्माण होईल. यामुळे देगलूर व मुखेड तालुक्याची तहान भागेल. तसेच समांतरपणे मुखेड तालुक्यातील बुडीत होणाऱ्या सर्व गावांचा प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले आहेत.

शेतकऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान वाटप, वाढीव कुटुंब पुर्नवर्सन अनुदान वाटप, भुखंड वाटप तसेच सर्व गावातील नागरी सुविधा लवकरात लवकर पुर्ण करुन प्रकल्पग्रस्तांना स्थानांतरीत करण्याचे व प्रकल्पाचे घळभरणीचे आदेश जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी दिले आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button