Young farmer commits suicide : कर्जबाजारी आणि अतिवृष्टीमुळे युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
हिमायतनगर,अनिल मादसवार | अतिवृष्टीमुळे झालेले शेतीचे नुकसान, बँकेचे वाढते कर्ज आणि मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च या विवंचनेत अडकलेल्या लक्ष्मण पोतंन्ना पालजवाड (वय ४५, रा. आदेगाव, ता. हिमायतनगर) या शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी सुमारे ३ वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत पालजवाड यांच्यावर भारतीय स्टेट बँकेचे सुमारे दोन लाख रुपयांचे कर्ज होते. दोन मुली व एक मुलगा यांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी ते झगडत होते. मात्र यंदाही सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे नाल्यालगत असलेल्या शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले. पिके वाहून गेल्याने शासनाच्या मदतीची अपेक्षा होती. मात्र ती देखील फोल ठरण्याची भीती आणि बैन्केची कर्ज भरण्यासाठी आलेली नोटीस वाढत्या आर्थिक अडचणींमुळे त्यांनी आपल्या शेत सर्वे क्रमांक २४१ मधील पळसाच्या झाडाला बैलाच्या बेरडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
घटनेन...
