Pandurang shinde ;बळेगाव व बाभळी बंधारा बॅकवॉटरमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी लढा उभा करणार.. रयत क्रांती संघटनेचे पांडुरंग शिंदे -NNL
नायगांव/नांदेड। बळेगाव बाभळी बंधारा बॅकवॉटरमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आम्ही नायगाव, उमरी, धर्माबाद, बिलोली तालुक्यातील शेतकऱ्याला एकत्र करून लढा उभा करणार आहोत असे रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी आज पाटोदा येथील शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले.
नांदेड जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी गोदावरी ही पुढे तेलंगणा राज्यांमध्ये वाहत जाते. या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये बळेगाव व बाभळी बंधारा बांधण्यात आलेला आहे. गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने या दोन बंधाऱ्याच्या बॅक वॉटर मुळे लाखो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली येते, त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद मका इ. पिकाचे नुकसान होते. यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे त्याचा आर्थिक कणा मोडलेला आहे.
यावर्षी तर दि.०१ ते ०४ सप्टेंबर पर्यंत संपूर...
