Chief Executive Officer Meenal Karanwal : ग्रामपंचायतींनी शुद्ध व शाश्वत पाणीपुरवठ्याची जबाबदारी पार पाडावी – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL
नांदेड| ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि शाश्वत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींनी सक्षमपणे पार पाडावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.
मंगळवार दिनांक 17 डिसेंबर रोजी नांदेड येथे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन व पाणी गुणवत्ता सनियंत्रण सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत पाणी गुणवत्ता विषय कार्यशाळा व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी आयएएस अधिकारी अनुष्का शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील, वरिष्ठ भुवैज्ञानिक अधिकारी डॉ. भालचंद्र संगमवार, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक भोजराज आदी मान्यवर उपस्थित होते.
पाणी स्रोतापासून पाणीपुरवठा होईपर्यंत कुठेही पाणी दूषित होणा...
