Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : मुलींच्या सुरक्षितेसाठी पालकांनी जागरूक असावे- कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL
नांदेड| आपल्या घरात मुलींचा जन्म झाल्यावर जिलेबी वाटण्यापासून आनंद व्यक्त करायला सुरुवात होते. मुलींच्या बालवयात आई-वडिलांचे तिच्याशी घट्ट नाते असते. तिचा प्रत्येक लाड पुरवण्यात येतो. तिला जवळ घेऊन गोंजरविण्यात येते. तिच्याशी छान-छान मनमोकळ्या गप्पा होतात पण मुलगी दहावी पास झाल्यानंतर, आता आपली मुलगी मोठी झाली म्हणून पालक तिच्याकडे थोडे दुर्लक्ष करतात. यामध्ये पालक आणि मुलींमध्ये हळूहळू दुरावा निर्माण होतो. कारण आता ती मोठी झाली तिचे तिला सर्व काही कळते. अशी समजूत पालकांची असते. आणि नंतर याच वयात मुली बाहेरच्या मित्र-मैत्रिणींच्या सानिध्यात येतात. त्यात एखादीला संगत चुकीची लाभली तर ती अत्याचारास बळी पडते म्हणून जरी आपली मुलगी मोठी झाली तरी जसे आपण तिच्याशी लहानपणी जसे वागत होतो तसेच ती मोठी झाल्यावरही वागावे, जेणेकरून ती कोणत्याही अत्याचारास बळी पडणार नाही. नाते दृढ ठेवून मुलींशी नेहमी संव...




