New Direction :संघाच्या समाजकेंद्री कार्यातून भटक्या-विमुक्तांसाठी नवदिशा” परिसंवादामध्ये मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार
नांदेड l "भटक्या आणि विमुक्त जातींच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक उत्थानासाठी रचनात्मक चळवळी आणि नव्वदोत्तरी मराठी साहित्य यांचा समन्वय आवश्यक आहे," असे प्रतिपादन विविध मान्यवरांनी केले. 'आधुनिक सामाजिक-राजकीय चळवळी व नव्वदोत्तरी साहित्य' या विषयावरील परिसंवादात त्यांनी आपले विचार मांडले.
या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दत्ता जोशी होते. परिसंवादात काशिनाथ पवार, मृणालिनी नानिवडेकर, आणि आशुतोष अडोणी यांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले. या कार्यक्रमाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, कुलगुरू डॉ. अशोक महाजन, व लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
भटक्या-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर भाष्य करताना काशिनाथ पवार म्हणाले, "पूर्वी या समाजाची जीवनपद्धती परिघाबाहेरची होती. शिक्षण व संधीपासून तो वंचित राहिल्याने त्यांच्या...
