Bachubhau Kadu warns : शेतकऱ्यांना हक्काचा भाव व कर्जमाफी न दिल्यास नागपूर येथे भव्य आंदोलन – बच्चुभाऊ कडूंचा इशारा
हिमायतनगर (अनिल मादसवार) जोपर्यंत शेतकरी एकजुट होत नाहीत तोपर्यंत सरकार झुकणार नाही. शासनाने शेतकरी पेटून उठण्या अगोदर शेतकऱ्यांच्या मालाला हक्काचा भाव, कर्जमाफी याबाबत भूमिका स्पष्ट न केल्यास आगामी काळात नागपूर येथे भव्य आंदोलन उभारले जाईल, असा इशारा प्रहार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री तथा कामगार नेते बच्चुभाऊ कडू यांनी हिमायतनगर तालूक्यातील कामारी येथील मंचावरून दिला.
दिनांक १५ सप्टेंबर रोजी हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार व कामगार बांधवांच्या हक्कासाठी लढा देणारी "हक्क यात्रा" प्रहार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री तथा कामगार नेते बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली दाखल झाली. कामारीत बच्चू कडू यांच्या स्वागतासाठी उसळलेल्या जनसागराने "आपणा भिडू बच्चू कडू" अशा घोषणा दिल्या. पारंपरिक सर्जा-राजाच्या सजविलेल्या बैलजोडी असलेल...
