Chikhlikar ; नागरीकांच्या अडीअडचणींचे गावातच निराकरण झाले पाहिजे! आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर
महाराष्ट्र राज्य निर्मीती नंतर पहिल्यांदाच महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळाले ., महायुती सरकार सामान्य नागरिक, लाडक्या बहिणी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसाचा कृती कार्यक्रम अंतर्गत म शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येत असुन छोट्या-मोठ्या कामासाठी तालुक्याच्याफेऱ्या टाळण्यासाठी प्रशासन आपल्या गावात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरीकांच्या अडीअडचणींचे गावातच निराकरण झाले पाहिजे.बीडीओ याचे कामात लक्ष नाही घरकुल योजनेत लाभार्थ्यांना वेळेत अनुदान द्यावे. सोमवारी कंधार येथे आठवडी बाजार असतो त्यामुळे शक्यतो अधिकारी यांनी कार्यालयात राहावे असे सूचना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केल्या
शिराढोण ( ता कंधार) येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम शनिवारी ( ५ एप्रिल ) गावात घेण्यात आला .यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी आश्...
