H.B.P. Krishna Maharaj Bompilwar ; दुर्जुनाच्या संगतीपेक्षा सज्जनांच्या संगतीत राहिल्यास जिवनाचा मार्ग सुखकर होईल – ह.भ.प.कृष्णा महाराज बोंपीलवार – NNL
हिमायतनगर l दुर्जन माणसांची संगत करणे म्हणजे इंगळीचा दंश घेणे होय. दुर्जनांची संगत ही दंशाइतकी दाहक असते. तुम्ही दुर्जनांच्या संगतीने दुर्जन होता. म्हणून यावर उपाय एकच आहे. सद्गुणांचा अंगीकार करणे. म्हणून सज्जन व्यक्तींच्या संगतीत राहायला हवे. सत्संग सदा घडायला हवा. म्हणजे दुर्गुणांचा दाह शांत करता येईल. सज्जन माणसाच्या संगतीने आपल्यातले दुर्गुण नाहीसे होतात. दुर्गुणाच्या इंगळीचा दाह शमतो. म्हणून सत्संग हा दाह शांत करणारा एकमेव उपाय आहे म्हणून दुर्जनाच्या संगतीपेक्षा सज्जनांच्या संगतीत राहिल्यास जिवनाचा मार्ग सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही असे आवाहन ह.भ.प.कृष्णा महाराज यांनी केले आहे.
कारला येथील श्री कृष्ण मंदिराच्या अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.रविवारी सायंकाळची किर्तन सेवा ह.भ.प.कृष्णा महाराज बोंपीलवार यांची झाली आहे.या किर्तन प्रसंगी बोलताना म...
