Nanded ; “समाज सुसंघटित करून भारताला परमवैभव प्राप्त करून देणे हेच संघाचे ध्येय” – श्री आशिष सिंह चौधरी
नांदेड l राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा चंद्रगुप्त नगराचा विजयादशमी उत्सव श्री स्वामी समर्थ केंद्र सिडको येथे संपन्न झाला. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या स्थापनेला या विजयादशमीला शंभर वर्ष पूर्ण होत असून स्वाभाविकच त्याचा उत्साह संपूर्ण स्वयंसेवकांमध्ये आहे.
संघाच्या या शंभर वर्षाच्या प्रवासात संपूर्ण हिंदू समाजाचे आणि स्वयंसेवकांच्या परिवाराचे योगदान महत्वपूर्ण राहिले आह. समाजाच्या सहकार्यामुळेच हा शताब्दी प्रवास यथोचित झाला आहे. परंतु संघाचे कार्य अविरत अखंडपणे चालणारे आहे. मातृभूमीला परम वैभवसंपन्न करण्यासाठी सर्वांना सोबत मिळून काम करावे लागणार आहे.
संघाच्या पंच परिवर्तनातून समाज परिवर्तन आपल्याला घडवून आणायचे आहे असे वक्तव्य उत्सवाचे प्रमुख वक्ते आशीष सिंह चौधरी यांनी यावेळी केले. यावेळी व्यासपीठावर नगर कार्यवाह तुकाराम भरत बेस्ते व प्रमुख पाहुणे श्री मोहन घोगरे ( वृक्ष मित्र ) उपस्...
