A house without a woman is in trouble – Suryakanta Patil : बाई नसलेल्या घराला कडीकोंडा लागतो – माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील – NNL
नांदेड| 'ज्या घरात बाई नसते त्या घराला कडीकोंडा लागतो. बाई हे घराचे शहाणपण असते. बाईशिवाय घराला घरपण नसते. खेड्यातील स्त्रीच्या वाट्याला खूप कष्टाचे जगणे येते. परंतु त्याविषयी तक्रार करण्याचे स्वातंत्र्य नसते. मी सुध्दा खेड्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेली आहे. माझ्या सारखी बंडखोर स्त्री जेव्हा याबाबतीत आवाज उठवण्याचा प्रयत्न करते तेव्हा समाज तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो. बाईच्या जगण्यातील घालमेल अचूकपणे टिपणारी कविता माझ्या मातीतील श्रीनिवास मस्के हा कवी करतो याचा मला खूप अभिमान आहे. असे प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी केले.
नांदेड येथील नियोजन भवनात आयोजित प्रसिध्द कवी श्रीनिवास मस्के यांच्या 'बाईपणाचा दस्तऐवज' या कवितासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत त्या बोलत होत्या. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी श्रीकांत देशमुख यांच्या हस्ते कवितासंग्रह...
