Sarang Chaitanyaji Maharaj : “श्रीमद भागवत कथा” मानवाच्या संपूर्ण जीवनाचा जन्मापासून मोक्षापर्यंत आध्यात्मिक प्रवास – हभप.सारंग चैतन्यजी महाराज
हिमायतनगर, अनिल मादसवार| मृत्यूपूर्वी जर चित्त भगवंतात स्थिर असेल, तर आत्म्याला पुढील जन्माची आवश्यकता राहत नाही. गंगेचा जल, रामाचे नाम, संतसंग, आणि भगवंताचे चरणस्मरण हे जीवनाच्या शेवटी मुक्तीचे द्वार उघडतात. श्रीमद भागवत कथा (Shrimad Bhagwat Katha) हा ग्रंथ केवळ एक धार्मिक पुस्तक नाही, तो मानवाच्या संपूर्ण जीवनाचा जन्मापासून मोक्षापर्यंत आध्यात्मिक प्रवास सांगतो. श्रीमद भागवत म्हणते "मानवाचा खरा धर्म तोच की, जो भगवंतावर निःस्वार्थ भक्ती निर्माण करतो आणि ज्यामुळं आत्मा आनंदित होतो." "प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार प्रत्येक गोष्ट आधीच लिहून ठेवलेली आहे" ही कल्पना भारतीय संस्कृतीत 'प्रारब्ध', 'कर्म' आणि 'दैव' या तत्त्वज्ञानाशी संबंधित आहे. असे विचार हभप.सारंग चैतन्यजी महाराज (Habap.Sarang Chaitanyaji Maharaj) यांनी मांडले.
वाढोणा येथील श्री परमेश्वर मंदिरात श्रीमद भागवत महापुराण कथेला दिनां...
