Sahitya Sanmelan ; साहित्य संमेलनाने जगविली मराठी भाषा संस्कृती
मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर काही लेखनकृतींनी वा ताम्रपट, शिलालेख यांनी मराठी भाषा दस्तऐवजीकरण करण्यास हातभार लावला आहे. या लिपीबद्ध संसाधनांमुळे भाषेच्या इतिहासाचा नेमका शोध घेता आला. या तुलनेत साहित्य संमेलनाचा इतिहास हा केवळ दीडशे वर्ष जुना आहे. ब्रिटिशांच्या आगमनानंतर आपल्याकडे लेखक-कवी ही व्यक्तिमत्वे स्वतंत्रपणे अस्तित्वात आली. समूहापेक्षा आपण निराळे आहोत, आणि वेगळा विचार करत आहोत, ही जाणीव या व्यक्तींकडे होती. (मध्ययुगात ही जाणीव असली तरी लेखक-कवी व्यापक लोकसमूहाचा भाग होते.)
साहित्य संमेलनाचा प्रारंभ
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रंथ व्यवहाराशी संबंधित काही मंडळी पुण्यात एकत्र आली आणि १८७८ मध्ये त्यांनी पहिले ग्रंथकार संमेलन घडवून आणले.
साधारणतः तेव्हापासून साहित्य संमेलनांना सुरुवात झाली असे म्हणता येते.
साहित...
