Cataclysm-Free Maharashtra : “मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” अभियान – जनतेपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री अतुल सावे
नांदेड| "मोतीबिंदू हा दुर्लक्षित राहिल्यास अंधत्वास कारणीभूत ठरतो. त्याच्या वेळीच निदान व उपचारासाठी नागरिकांपर्यंत ही मोहीम पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे," असं आवाहन महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री मा. अतुल सावे यांनी केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून २२ जुलै ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राज्यात “मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. हे अभियान जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवा, असे आवाहन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. आज जिल्हा रुग्णालयात त्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे “मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” या विशेष मोहिमेचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ....
