Pranithatai Deore Chikhlikar : सेंद्रिय शेती काळाची गरज- प्रणिताताई देवरे चिखलीकर
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा| रासायनिक खतांचा अतिरेक टाळून सेंद्रिय शेतीकडे वळणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई देवरे- चिखलीकर यांनी केले. जिल्हा परिषद नांदेडच्या कृषी विभागाच्या वतीने माळेगाव यात्रेनिमित्त आयोजित कै. डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्रवार आऊलवार, माजी सभापती आनंदराव पाटील, रोहित पाटील, मोहीम अधिकारी सचिन कपाळे, गणेश साळवे, कृषी विज्ञान केंद्र पोखरणीचे डॉ. देविकांत देशमुख, डॉ. आर. एन. देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. प्रणिताताई पुढे म्हणाल्या, रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत खालावतो, उत्पादन खर्च वाढतो आणि आरोग्यावरही दुष्परिणाम होत आहेत. सेंद्रिय शेत...
