Pradeep Naik ; वृक्षारोपण सोबत संगोपनाची जबाबदारी आवश्यक :- प्रदीप नाईक – NNL
श्रीक्षेत्र माहूर/ राज ठाकूर | वृक्षारोपण करणे जेवढे गरजेचे आहे त्या पेक्षा लागवड करून झाडांचे संगोपन करणे तितकेच महत्वाचे आहे.वाढत्या औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे मत माजी आमदार प्रदीप नाईक यांनी व्यक्त केले.
माहूर तालुक्यातील लखमापूर येथील पंचशील विद्यालयांमध्ये आज दिनांक 12 सोमवार रोजी वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा तीहेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रदीप नाईक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मेघराज जाधव लखमापूरचे सरपंच गणेश राठोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिल जाधव, विनोद राठोड,शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश गा...
