Atul Save ; सामान्यांसह शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविण्यावर शासनाचा भर : पालकमंत्री अतुल सावे
महाराष्ट्र स्थापनेचा 66वा स्थापना दिन उत्साहात साजरा
जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना वेग द्यावा
टॅक्टर अपघातातील मृतकांच्या परिजनांना सानुग्रह निधीचे वाटप
उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार
नांदेड। राज्य शासन नेहमी सामान्य नागरिक, शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हिताच्या योजना राबवित असते. येणाऱ्या काळामध्ये शेती, माती, कृषी सोबतच अन्य सर्व क्षेत्रांमध्ये शाश्वत विकासावर राज्य शासनाचा भर राहील ,असे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.
नव्या सरकारच्या गठनानंतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर प्राधान्याने भर असून जिल्ह्यात आतापर्यत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 812 कोटींची मदत करण्यात आली आहे. शासनाच्यावतीने सामान्य जनतेच्या व शेतकऱ्यां...
