Dr.Jagdish Kadam : चौथ्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जगदीश कदम यांची निवड
नांदेड| सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने होणाऱ्या चौथ्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी येथील सुप्रसिध्द साहित्यिक डॉ. जगदीश कदम यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. जगदीश कदम (Dr.Jagdish Kadam) यांचे ग्रामीण साहित्यात मोलाचे योगदान असून सप्तरंगी साहित्य मंडळाच्या राज्य कार्यकारिणीने डॉ. कदम यांची निवड करुन निवडीचे पत्र त्यांना दिले आहे.
यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, उपाध्यक्ष पांडुरंग कोकुलवार, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, कवी गजानन हिंगमिरे यांची उपस्थिती होती. एकदीवसीय चौथे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन २७ जानेवारी रोजी मुदखेड येथील रणछोडदास मंगल कार्यालयात संपन्न होणार आहे. अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली. डॉ. जगदीश कदम हे हदगाव तालुक्यातील रुई या गावचे असून ते नांदेड येथील यशवंत महाविद्यालयातून मराठी विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त ...
