Venkataswami Maharaj : मनाला स्थिर करण्यासाठी मोबाईल नव्हे भगवंताचा नामस्मरण आवश्यक – व्यंकटस्वामी महाराज
हिमायतनगर| गृहस्थ आश्नमात राहुन संसारीक जीवन सार्थक करायचे असेल तर संस्कार जपणे महत्वाचे आहे. मनुष्याचा मन चंचल असते हे सर्वांनाच चांगल्याप्रकारे प्रकारें माहित आहे. मनाला स्थिर करण्यासाठी मोबाईल नव्हे भगवंताचा नामस्मरण करणे आवश्यक आहे. मोबाईल मुळे सर्वाधिक नुकसान हिंदू समाजाच होत आहे. आजुबाजुला काय चाललंय या बाबींकडे लक्ष ठेवून वागणे स्वतः सह जनहिताचे ठरु शकते असा मौलिक उपदेश परमपूज्य स्वामी बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी दिला.
ते पिंपळगाव येथील मठात गुरुपौर्णिमा उत्सव प्रसंगी उपस्थित झालेल्या सद्भक्तांना मार्गदर्शन करताना बोलत होते. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून श्री शिव सद्गुरू शिवलिंग स्वामी दत्त संस्थान मठ तिर्थक्षेत्र क्षेत्र पिंपळगाव येथे सकाळी ११ ते १२ या वेळात गुरूपुजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पुढे बोलताना बालयोगी व्यंकटस्वामी महाराज म्हणाले की, मनुष्य जन्मा...
