Due to heavy rains on Sunday रविवारच्या धुंवाधार पावसामुळे शहरातील अनेक प्रवेश मार्ग तासनतास झाले होते बंद -NNL
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरच्या विकासासाठी अंदाजे 150 कोटीहून जास्तीचा निधी खर्च झाला. मात्र आजही हिमायतनगर शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अर्धवट नळयोजनेच्या कामांसह, शहरातून गेलेल्या अर्धवट राष्ट्रीय महामार्ग कामात अभियंता, ठेकदाराकडून झालेली हेराफेरी, राजकीय नेत्यांच्या टक्केवारीच्या हिस्सेदारीमुळे विकास कामात बोगसपणा आल्याने हिमायतनगर शहराचा सत्यानाश झाला आहे. अशी संतापजनक भावना रविवारी दुपारी झालेल्या पावसाच्या पाण्याने तासनतास मुख्य प्रवेश रस्ते बंदच्या त्रासाला वैतागलेल्या विकास प्रेमी नागरिकांनी व्यक्त केली आहे. जनतेच्या विकासाच्या नावाखाली स्वतःच्या विकास करून घेणाऱ्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या परिवर्तनाच्या लाटेतून दाखवून देण्याची भाषा देखील अनेकांनी बोलून दाखविली आहे.
हिमायतनगर ग्रामपंचायतीला मागील नऊ वर्षांपूर्वी नगरपंचायतीचा दर्जा मिळाला नगरपंचायत झाल्...
