damage to farmers’ crops : टाटा पॉवर सोलारच्या पाण्यामुळे कारला गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी रस्त्यावरील व कारला शिवारातील जवळपास दिड ते दोन हजार एकर जमीन खरेदी करून टाटा पॉवर कंपनीकडून या ठिकाणी सोलार पॅनलचा प्रकल्प तयार केला गेला. सदरील जमिनी वर सिमेंट कांक्रेट बांधकाम झाले असल्याने या जमिनीत मुरणारे सर्व पाणी कारला शिवारात जात असुन, पुराचा ओघ वाढत असल्यामुळे दोन दिवसांपासून नाल्यांना पूर वाहू लागला आहे.यामुळे सर्व जमिनी खरडून गेल्या असुन यास टाटा पॉवर कंपनी जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील गेल्या तिन दिवसांपासून अतिवृष्टी सदृश परिस्थिती निर्माण आहे.या पावसामुळे शेतकऱ्यांची पिके अक्षरशा उद्ध्वस्त झाले आहेत.यातच बोरगडी कारला शिवारात टाटा पॉवर कंपनीकडून मोठा सोलार प्रौजेक्ट उभारण्यात आला आहे.या सोलार मध्ये जमिनी दिल्या त्या जमिनीतील पाणी जागेवर मुरत होते. तसेच सर्व कट्टे फोडून जमीन सपाट करण...
