Huyatma smarak development ; नांदेड जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांचा विकासासाठी शासनाचं उदासीन धोरण -NNL
नांदेड। जिल्ह्यातील मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील शासनाने स्वतंत्र सैनिकाच्या सन्मानार्थ उभारलेल्या स्मारकांची दुरुस्ती सुशोभीकरण करून स्मारकांचा विकास अमृत महोत्सवी वर्षात करण्याची मागणी स्वातंत्र्यसैनिक उत्तरअधिकारी केदार पाटील साळुंके यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन लेखी देऊन चर्चा केली होती.
त्यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने जिल्हाधिकारी यांना बोलावून सर्वच स्मारकांचा विकास करण्याच्या सूचना वजा आदेश दिलेले होते मात्र अमृत महोत्सवी वर्ष संपले तरी विकास झाला नसल्याच्या निषेधार्थ 17 सप्टेंबर हा मुक्ती संग्राम दिन स्वातंत्र्यसैनिक उत्तरअधिकारी हे काळ्याफिती लावून साजरा करून शासनाचा निषेध नोंदवणार असल्याची माहिती स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी केदार पाटील साळुंके यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन कळवले आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष...
