Former MLA Shankar Anna Dhondge : शेतकऱ्यांना एकरी २५ हजाराची नुकसान भरपाई द्या – माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे
कंधार, सचिन मोरे| कंधार लोहा मतदारसंघामध्ये मागील आठवड्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. लोकप्रतिनिधी व आघाडी सरकार निष्क्रिय असून अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अवघड झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना एकरी २५ हजाराची नुकसान भरपाई द्या अन्यथा वेगळा विचार करावा लागेल असा गर्भित इशारा महाराष्ट्र राज्य समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी दिला.
महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ३ सप्टेंबर रोज बुधवारी सकाळी ठीक ११ वाजता धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्याची सुरुवात भुईकोट किल्ला कोटबाजार - मोठी दर्गा - गांधी चौक - कापड लाईन- शिवाजी चौक- आंबेडकर पुतळा यामार्गाने वाजत गाजत, नारे देत उपविभागीय कार्य...



